Monday, August 22, 2011

विटाळ पहाटे जेव्हा जाग येते ....

विटाळ पहाटे जेव्हा जाग येते
विटाळ पहाटे जेव्हा जाग येते
साथ तुझी नसेल या पुढे
जिवंत मनी मरतो मी त्या क्षणी
भीषण आहेत तुझ्या त्या आठवणी......

तू जेव्हा सोडून गेलीस तेव्हाच वधलो..... उरलो देहापुरता, उरले शरीर, उरल्या त्या आठवणी....

आठवते तुझे हास्य, आठवतो तुझा श्वास
आठवतात तुझे नेत्र, आठवतो तुझा त्रास
तुझे ते हासुनी पाहणे, डोळ्यांनी विचारणे
क्षणात जवळ येणे, क्षणात सोडून जाणे

विटाळ पहाटे जेव्हा जाग येते
विटाळ पहाटे जेव्हा जाग येते
साथ तुझी नसेल या पुढे
जिवंत मनी मरतो मी त्या क्षणी
भीषण आहेत तुझ्या त्या आठवणी......

आठवतात ते क्षण जेव्हा समजूत तुझी नाराजी माझी, आता मनाची नाराजी, अश्रूंची समजूत, तुजवीण हि अवस्था माझी.....
कळसावूनी टाकले माझे सुख मी कधीचे
जन्मताच ते पूजले दुख मी पाचवीचे
आता उडे राख स्वप्नांची ती धुमसत
दिनरात रडे एक विराणी घुसमट

विटाळ पहाटे जेव्हा जाग येते
विटाळ पहाटे जेव्हा जाग येते
साथ तुझी नसेल या पुढे
जिवंत मनी मरतो मी त्या क्षणी
भीषण आहेत तुझ्या त्या आठवणी......

देह हा शांत निपचित एका स्मशानी, वाऱ्यामध्ये विरत आहे एक उदास विराणी......

उरले मन हे बेवारस प्रेत माझे
बसले उकिरडे झीझवीत ते तुझे
तुटलेली ती सांज, तुटलेले नाते
तुटलेल्या वाटा, आणि तेव्हा जाग येते.....
.
.
विटाळ पहाटे जेव्हा जाग येते
विटाळ पहाटे जेव्हा जाग येते
साथ तुझी नसेल या पुढे
जिवंत मनी मरतो मी त्या क्षणी
भीषण आहेत तुझ्या त्या आठवणी......

जाग आली पण पुन्हा डोळे मिटतील, तुझ्या विना जगण्यात सारी वर्ष सलतील... भ्रष्ट ते दिवस... नासलेल्या सांजा, आणि ती विटाळलेली पहाट..

No comments:

Post a Comment